“मत खाण्याच्या राजकारणाने दलित समाजाचं भलं होणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी…”; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दलित पँथरचा उल्लेख करतानाच थेट प्रकाश आंबेडकरांचंही नाव घेतलं.
रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी औरंगाबादमध्ये रिपब्लिक ऐक्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करतानाच आमचा भाजपाला पाठिंबा असल्याने आम्ही उमेदवार उभे केले नाहीत असं आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. याचवेळी त्यांनी दलित मतांसंदर्भात भाष्य करताना बहुजन वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचाही उल्लेख केला.
“उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला तीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील. आम्ही उमेदवार उभे केले नाही. आमचा भाजपाला पाठिंबा आहे. दलित मतांवर मायावतींनाच फक्त अधिकार नाही. दलित ऐक्यासाठी पुढे आले पाहिजे. दलित पँथरची स्थापना नव्याने करण्याची गरज आहे, सत्तेत येणाची इच्छा प्रत्येकला असते मात्र तशी ताकद निर्माण झाली पाहिजे. विखूरलेला समाज एकवटण्याची गरज आहे,” असे मत आठवलेंनी व्यक्त केले आहे.